Shivrayanche Eknishta Mavle 7 Pustakancha Set ( गुप्तहेर बहिर्जी नाईक + नेतोजी पालकर + तानाजी मालुसरे+ हंबीरराव मोहिते + शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे+कान्होजी जेधे, जिवाजी महाला+येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद)
Shivrayanche Eknishta Mavle 7 Pustakancha Set ( गुप्तहेर बहिर्जी नाईक + नेतोजी पालकर + तानाजी मालुसरे+ हंबीरराव मोहिते + शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे+कान्होजी जेधे, जिवाजी महाला+येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद)
Couldn't load pickup availability
गुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी - पाने - 72
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते.
सदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.
नेतोजी पालकर | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने -64
शिवरायांचे सरसेनापती नेतोजी पालकर हे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. अगदी लहानपणी सुलतानी राजवटीच्या अत्याचाराने पिडित असलेला त्यांचा परिवार कोकणातील चौक या गावी आला. सुलतानी संकटांशी दोन हात करुन आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे, या विचाराने त्यांनी तरुणांना एकत्र करुन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. पुढे ते गावचे पाटील झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यापासून ते होते. प्रथम किल्लेदार व नंतर नेतोजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले.
सरनौबत असताना अफजलखान प्रसंग असो अथवा थेट विजापूरची राजधानी, नेतोजींची झंझावत हे प्रसंगाने आदिलशाहची घाबरगुंडी उडाली होती. फाजलखानचा पराभव , उंबरखंडातील पराक्रम, सुरतेवरील आक्रमण या प्रसंगी नेतोजींचा चढता आलेख बघितला की, मन थक्क होते.
तानाजी मालुसरे | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80
‘तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते.
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली. युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.
हंबीरराव मोहिते | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.!
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 72
स्वराज्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी अनेक नरवीर हसत हसत पुढे आले. त्यामधील शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या सारख्या नरवीरांच्या बलिदानामुळे हिंदवी स्वराज्य राखले गेले. यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा या पुस्तकात घेतला आहे.
सहा फूटांपेक्षा जास्त उंची असलेले, भक्कम शरीराचे, पहाडासारखे बाजीप्रभू देशपांडे हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते, तसेच ते प्रशासनाच्या कामातही पारंगत होते.
शिवरायांसारखे दिसणारे, मध्यम उंचीचे, रंगाने गोरे, मजबूत शरीर असलेले शिवा काशीद यांचे व्यक्तीमत्व फारच प्रभावी होते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद यांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आपली आहुती दिली. इतिहासातील अनेक वीर कसे जगले ते सांगितले जाते मात्र 'शिवा काशीद' यांनी कसे बलिदान दिले हे पुढील हजारों वर्षे सांगितले जाईल; हीच तर शिवा काशीद यांची थोरवी आहे
कान्होजी जेधे, जिवाजी महाला | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80
कान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत, 'मावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय'. कान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले.
भेदक नजर, भरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता.
कान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.
येसाजी कंक, कोंडाजी फर्जंद | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80
येसाजी कंक हे चपळ, निर्भय व धाडसी व्यक्तिमत्त्व जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात जमिनीवर पाय रोवून उभे होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा हत्तीएवढ्या ताकदीचा आहे, याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण होय.
कोंडाजी फर्जंद म्हणजे अचाट धाडस, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला तुंबळ युद्धासाठी पुकारणारा महावीर होय. भीती हा प्रकारच जणू या वीराला माहीत नव्हता. पन्हाळगड मोहीम यशस्वी करणार्या या वीराला जंजिरा मोहिमेत वीरमरण आले. या दोन्ही स्वामीनिष्ठ वीरांनी स्वराज्यासाठी जगायचे अन् स्वराज्यासाठीच मरायचे, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
Share
