Skip to product information
1 of 2

Shivnetra - Bahirji Naik - Khand 1 + 2 + 3 - All 3 Khand Combo - Set of 3 Books By Prem dhande ( शिवनेत्र बहिर्जी खंड ( १ ते ३ )

Shivnetra - Bahirji Naik - Khand 1 + 2 + 3 - All 3 Khand Combo - Set of 3 Books By Prem dhande ( शिवनेत्र बहिर्जी खंड ( १ ते ३ )

Regular price Rs. 1,144.00
Regular price Rs. 1,347.00 Sale price Rs. 1,144.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? 
अगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. 
ते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!
शिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.  
चार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – 
•    शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. 
•    बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली.
•    स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. 
•    स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. 
•    जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट. 
दुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –
•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. 
•    अफजलखानाचा वध. 
•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. 
•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. 
•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. 
तिसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते – 
•    बहिर्जी नाईकांनी सुरतेची माहिती कशी काढली. 
•    सुरतेची पहिली लुट आणि त्यात गुप्तहेरांचे योगदान. 

View full details