Skip to product information
1 of 2

Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Ganimi Kava By Navnath Jagtap Book is Free

Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj By Krushnarav Arjun Keluskar + Ganimi Kava By Navnath Jagtap Book is Free

Regular price Rs. 485.00
Regular price Rs. 649.00 Sale price Rs. 485.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज | लेखक -कृष्णराव अर्जुन केळूसकर + 

गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र | लेखक - नवनाथ जगताप 

-----------------------------------------------------------------

 शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज | लेखक -कृष्णराव अर्जुन केळूसकर| पाने - ५०४

     छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!

-----------------------------------------------------------------------------------------

गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १५२ 

शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.

डॉ. बाळकृष्ण
थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू

असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.

View full details