Shivcharitra By Prashant Kulkarni + Swarajyacha Chhava : Chhatrapati Sambhaji Maharaj By Navnath Jagtap, Vaibhav Salunke ( शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज)
Shivcharitra By Prashant Kulkarni + Swarajyacha Chhava : Chhatrapati Sambhaji Maharaj By Navnath Jagtap, Vaibhav Salunke ( शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज)
Couldn't load pickup availability
शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी | 250/-
पाने - १६८
'छत्रपती शिवाजी महाराज!'
हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.
हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंके | 250/-
पाने - १६०
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.
'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.
हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
Share
