Shivarayanche Rantandav + Shivcharitra + Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set ( शिवरायांचे रणतांडव + शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच + शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा)
Shivarayanche Rantandav + Shivcharitra + Shivrayanche Eknishta Mavle 10 Pustakancha Set ( शिवरायांचे रणतांडव + शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच + शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा)
Couldn't load pickup availability
1) शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे|399/-
पाने - २८०
नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...
अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी!
पन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!
त्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!
रक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...
'शिवरायांचे रणतांडव'
2) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी |250/-
पाने - १६८
'छत्रपती शिवाजी महाराज!'
हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो.
हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. त्यांनी सामान्य, विखुरलेल्या माणसांना एकत्र आणले, त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली आणि आपल्या अजोड पराक्रमाने व अचूक रणनीतीने रयतेच्या 'हिंदवी स्वराज्याची' मुहूर्तमेढ रोवली. हे पुस्तक म्हणजे केवळ एका राजाची शौर्यगाथा नाही, तर ती एका खन्ऱ्या 'युगप्रवर्तका'च्या प्रेरणादायी संघर्षाची, त्याच्या दूरदृष्टीची आणि कालातीत तत्त्वज्ञानाची ओळख आहे.
3) शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच *लेखक - प्रशांत कुलकर्णी
किंमत - १२००/-
• बहिर्जी नाईक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख, जे वेश बदलून शत्रूच्या गोटातून माहिती मिळवत असत.
• नेतोजी पालकर: शिवरायांचे सरसेनापती, ज्यांनी सुलतानी संकटांशी दोन हात करून गावाचे रक्षण केले आणि अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला.
• तानाजी मालुसरे: निष्ठावान मावळा, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य दाखवून विजय संपादन केला आणि सिंहगड मोहिमेत अजरामर झाले.
• हंबीरराव मोहिते: 'मोडेल पण वाकणार नाही' वृत्तीचे, रांगडे सरसेनापती ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळात अमोघ कार्य केले.
• शिवा काशीद: शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, शिवरायांसारखे दिसणारे एक सामान्य कुटुंबातील शूरवीर.
• बाजीप्रभू देशपांडे: पहाडासारखे भक्कम शरीराचे, पराक्रमी लढवय्ये आणि प्रशासनातही पारंगत असलेले महान योद्धा.
• कान्होजी जेधे: शहाजीराजांचे विश्वासू सरदार आणि मावळ भागातील देशमुखांना एकत्र करून स्वराज्यात आणणारे जुने जाणते व्यक्तिमत्त्व.
• जिवाजी महाला: भेदक नजर आणि भरभक्कम शरीरयष्टी असलेले दांडपट्टा बहाद्दर, ज्यांनी सय्यद बंडाचा हात कलम करून महाराजांचा जीव वाचवला.
• येसाजी कंक: चपळ, निर्भय आणि धाडसी व्यक्तिमत्त्व, जे महाकाय हत्तीसमोरही दिमाखात उभे राहिले.
• कोंडाजी फर्जंद: अचाट धाडस असलेले, शत्रूच्या हद्दीत जाऊन त्याला युद्धासाठी आव्हान देणारे महावीर.
• बाजी पासलकर: मोसे खोर्यातील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील पहिली समिधा.
• प्रतापराव गुजर: धाडसी वीर आणि हिंदवी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती ज्यांनी साल्हेर येथे मुघलांचा पराभव केला.
• रामजी पांगेरा: 'अग्नीप्रमाणे वीर' असे वर्णन केलेले पराक्रमी योद्धा, ज्यांनी कण्हेरगडावर दिलेरखानाच्या हजारो सैन्याला माघार घ्यायला लावली.
• मुरारबाजी देशपांडे: पुरंदरच्या लढाईत प्रचंड शौर्य गाजवणारे, ज्यांच्या पराक्रमाने दिलेरखानही थक्क झाला.
• नऱ्हेकर देशपांडे (बापूजी, चिमणाजी, बाळाजी, केसो नारायण, नारायण): खेडेबारेतील ही कुटुंबियांची तीन पिढ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले.
• फिरंगोजी नरसाळा: चाकणचे शूर किल्लेदार, ज्यांनी शाहिस्तेखानाच्या हजारो सैन्याला केवळ तीनशे मावळ्यांनिशी छप्पन्न दिवस झुंजवले.
• हिरोजी इंदुलकर: वास्तूविशारद, ज्यांनी सिंधुदुर्ग आणि रायगडची अप्रतिम रचना केली आणि आपली स्वामीनिष्ठा दाखवली.
• बाळाजी आवजी चिटणीस: शिवरायांना राजापुरात मिळालेले अनमोल रत्न, ज्यांनी आपल्या मोत्यासारख्या अक्षराने अनेक नाजुक प्रश्न सोडवले.
Share
