Senapati Dhanaji Jadhav By Uttam Hanwate
Senapati Dhanaji Jadhav By Uttam Hanwate
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या इतिहासात मोगलांविरुद्ध मराठ्यांचे जे 'स्वातंत्र्ययुद्ध' झाले त्याला अनन्यसाधारण स्थान आहे. औरंगजेबाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मराठ्यांनी अनेक आपत्ती सोसून आणि आपलं जीवन महाराष्ट्राला अर्पण करून ते स्वातंत्र्ययुद्ध जिंकलं. म्हणूनच राज्य सुरक्षित राहिलं आणि पुढच्या शतकात हिंदुस्थानभर वृद्धिंगतही झालं. मुघलांविरुद्धच्या निर्णायक स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधवराव- संताजी घोरपडे या पराक्रमी वीरांचा फार मोठा वाटा होता. मोघलांच्या पारतंत्र्यातून त्यांनी महाराष्ट्राचे रक्षण केले. इतिहासातील हा सर्व कालखंडच अनेक वीरश्रीयुक्त लढायांनी भरलेला आहे. त्याचे श्रेय छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य, पंत प्रतिनिधी, धनाजी जाधवराव आणि संताजी घोरपडे यांनाच दिले पाहिजे. त्यातही धनाजी जाधवरावांच्या धारदार तलवारीने जे कार्य केले त्याला तोड नाही.
Share
