Satya Asatyashi Man Kele Gvahi By G. D. Parekh (सत्य असत्याशी मन केले ग्वाही)
Satya Asatyashi Man Kele Gvahi By G. D. Parekh (सत्य असत्याशी मन केले ग्वाही)
Couldn't load pickup availability
या पुस्तकात लेखकाने एका विलक्षण चिकाटीने तुकोबारायांच्या अभंगांची सुयोग्य निवड करून विनोबाजींच्या विचारांपासून ते भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे आणि सदानंद मोरे यांच्यासारख्या दिग्गज अभ्यासकांच्या विचारांची व्यवस्थित चर्चा करणारे हे संकलन नक्कीच खूप समृद्ध आहे. वाचता वाचता तुकारामांची सत्यनिष्ठा, त्यांनी प्रस्थापित परंपरा, कर्मकांड आणि रूढींविरुद्ध केलेला विद्रोह तर ध्यानात येतोच पण सत्य, अहिंसा, प्रेम, समता, विश्वबंधुत्व, दया, न्याय आणि क्षमा इत्यादी उदात्त मूल्ये प्रत्यक्षात साकार करण्याचा त्यांचा ध्यास आणि त्याचा तुकारामांची सत्यनिष्ठा आणि ईश्वरप्राप्तीशी असलेला संबंध आपल्या मनावर ठसतो. उदात्त नीतिमूल्ये ढासळत चालणाऱ्या आजच्या जगात त्यांना संजीवनी देण्याचा या संकलनात झालेला हा निर्मळ प्रयत्न निश्चितपणे वंदनीय आहे.
Share
