Sagla Ulathvun Takala Pahije by Deva Zinjad (सगळ उलथवून टाकलं पाहिजे)
Sagla Ulathvun Takala Pahije by Deva Zinjad (सगळ उलथवून टाकलं पाहिजे)
Couldn't load pickup availability
‘सगळे उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहात कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेले अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत. अनेक पदरी अनुभवांचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत. या कवितांमध्ये ओळी-ओळींतलं सामाजिक भान आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कोवळ्या मनानं गावखेड्यात सोसलेले चटके, गरिबीनं होरपळलेलं हळवं मन विचारी झाल्यावर तुलना करू लागतं. तो काळ आणि हा काळ यातली स्थित्यंतरं टिपू लागतं. विरोधाभास, उपहास सहजपणे बोलण्या-लिहिण्यात येऊ लागतो. मग सगळं उलथवून टाकण्याची उर्मी भाषेत येते. क्रांतीची भाषा बोलली जाते.
अंतरीची ओल घेऊन आलेलं साहित्यच काळाच्या पटलावर टिकून राहतं. डोक्यावरून ओझं न्यायचं असेल तर रूतू नये म्हणून आपण ओझ्याखाली चुंभळ घेतो. ओझं जरा सुसह्य करतो. तशाच प्रकारे कवितेची चुंभळ करून वास्तवाचं ओझं पेलत कवी झिंजाड आपलं जगणं सुसह्य करतात.
Share
