Operation Sindoor By Wg Cdr Vinayak Davare (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
Operation Sindoor By Wg Cdr Vinayak Davare (ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर)
Couldn't load pickup availability
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरमधील पहेलगाम येथे अतिरेक्यांनी आतंकी हल्ला करून, २६ निरपराध प्रवाशांना धर्म विचारून ठार मारले. त्या निघृण आतंकी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सशस्त्र सेनादलांनी 'ऑपरेशन सिंदूर' ची कारवाई केली. पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मिरमधील नऊ आतंकी तळ नष्ट करणे; पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिम (प्रणाली) चा नाश करणे; पंधरा भारतीय विमानतळांवर केलेल्या पाकिस्तानी हलूयांचा प्रतिरोध करून एकही पाकिस्तानी क्षेपणास्त्र अथवा ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचवू न देणे; आणि अकरा पाकिस्तानी सैनिकी तळांचा तेथील कमांड तथा कण्ट्रोल सेंटर्स सहित नाश करणे, या सर्व घटना भारतीय सशस्त्र सेनादलांनी केवळ ८८ तासांमध्ये (दि. ६ ते १० मे २०२५) यशस्वीरीत्या घडवल्या.
परिणामतः पाकिस्तानला युध्दविरामाची याचना करण्यास भाग पाडले. हे अत्यंत कठीण कार्य करून सैनिकी दृष्ट्या प्रचंड यश संपादन केले. त्यामुळे भारतीय सशस्त्र सेनादलांचे, विशेषतः भारतीय वायुसेनेचे, स्थान विश्वामधील अपराजित सेनादलांमध्ये दृढ झालेले आहे. अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' च्या अतुलनीय यशाच्या मागे भारतीय राजकीय इच्छाशक्ति, सशस्त्र सेनादलांना प्रदान केलेली स्वायत्तता, आत्मनिर्भरता, सशस्त्र सेनादलांचा उत्कृष्ट समन्वय आणि पराक्रम, तसेच त्यांना असलेला डी.आर.डी.ओ., इस्त्रो, आदी संस्थांचा अप्रतिम सहयोग, अशा घटकांमुळे हे अप्रतिम यश प्राप्त झाले. त्याचे विश्लेषण येथे दिलेले आहे.
Share
