Skip to product information
1 of 5

Manache Vyavasthapan By Navnath Jagtap (मनाचे व्यवस्थापन)

Manache Vyavasthapan By Navnath Jagtap (मनाचे व्यवस्थापन)

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 120.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मनाचे व्यवस्थापन । लेखक - नवनाथ जगताप 
पाने - ८० 

मन हे आपल्या अंतरंगातील एक अदृश्य भाग आहे, ज्यावर आपले सर्व निर्णय, भावना, वेदना, इच्छा, प्रतिज्ञा आणि स्वप्ने अवलंबून असतात. सकारात्मक मन ही खरोखरच देवाने दिलेली देणगी आहे, कारण आपल्या जीवनाचे व्यवस्थापन या मनरूपी अवयवावरच अवलंबून असते.

आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग शोधत असतो. यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांचीच मनाची शांतता हरवली आहे. लहान मुलांना बालवाडीपासूनच इतका अभ्यास दिला जातो की ती थकून जातात. आपली मुले सर्वच गोष्टींमध्ये अव्वल असावीत या हट्टामुळे पालकही तणावात राहतात आणि त्यांची मुलेही. तरुण पिढीतील मुलांना तर सतत ताण आणि तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे नैराश्याची (डिप्रेशन) समस्या वाढत चालली आहे.

या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून, नवनाथ जगताप यांनी लिहिलेले "मनाचे व्यवस्थापन" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते. या पुस्तकात त्यांनी 'मनाचे व्यवस्थापन म्हणजे काय?' इथपासून ते 'मनाचे व्यवस्थापन कसे करावे?' आणि 'ते केल्यावर आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल होतात?' याचे सविस्तर वर्णन केले आहे.

हे पुस्तक वाचकांना त्यांच्या मनाला योग्य सवयी लावून आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते. यात मानसिक शांती, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार, भावनांचे व्यवस्थापन, निर्णयक्षमतेचा विकास, ध्यान आणि आत्मसंवाद यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर सखोल विचार करण्यात आला आहे. आपले आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आणि ताण, तणाव, नैराश्य यांसारख्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी मार्गदर्शक आहे.

View full details