Skip to product information
1 of 4

Kshatriyakulawant Sadhu + Shivachatrapatinche Aramar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj+Chhatrapati Shivaji + Setu Madhavrao Pagadi By Nitin Thorat+ Gajanan Bhaskar Mehendale+Krushnarav Arjun Keluskar +Setu Madhavrao Pagdi

Kshatriyakulawant Sadhu + Shivachatrapatinche Aramar+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj+Chhatrapati Shivaji + Setu Madhavrao Pagadi By Nitin Thorat+ Gajanan Bhaskar Mehendale+Krushnarav Arjun Keluskar +Setu Madhavrao Pagdi

Regular price Rs. 1,080.00
Regular price Rs. 1,440.00 Sale price Rs. 1,080.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. 

शिवाजी महाराजांना शुन्यातून आपले आरमार निर्माण करायचे होते. सर्व उद्योग मुघलांना व आदिलशाहीला तोंड देत असताना जमिनीवरील युद्धाच्या सर्व गरजा भागवून करायचा होत. या सर्व अडचणींमधून मार्ग काढून शिवाजी महाराजांनी आपले आरमार निर्माण केले. आपल्या 'हलक्या व क्षुद्र' (इंग्रजांचे शब्द) नावांचाच वापर करून समुद्राचा अजिबात अनुभव नसलेल्या या माणसांनीच खांदेरीच्या मोहिमेत इंग्रजांसारख्या कुशल दर्यावर्दी लोकांच्या विरोधाला न जुमानता खांदेरीच्या किल्ल्याचे काम तडीस नेले.

   छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. 

भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. ते खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष असे राजे होते. 

View full details