Skip to product information
1 of 3

Kshatriyakulawant Sadhu+Sadhuputra Shambhu+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By By Nitin Thorat+Krushnarav Arjun Keluskar

Kshatriyakulawant Sadhu+Sadhuputra Shambhu+Shivcharitra Chhatrapati Shivaji Maharaj | By By Nitin Thorat+Krushnarav Arjun Keluskar

Regular price Rs. 990.00
Regular price Rs. 1,320.00 Sale price Rs. 990.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती.

🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :
साधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव

📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू
💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)

साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...

प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.

   छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र केळूसकरांनी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली.


View full details