Collector Sahiba Bhag 1 Ani 2 + Ashechya Gungit Latkele Tarunya ( कलेक्टर साहिबा भाग १, २ + आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य) )
Collector Sahiba Bhag 1 Ani 2 + Ashechya Gungit Latkele Tarunya ( कलेक्टर साहिबा भाग १, २ + आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य) )
Couldn't load pickup availability
कलेक्टर साहिबा भाग १, २ | लेखक- कैलास मंजू बिश्नोई
कादंबरीचा पुढील भाग पहिल्या भागात गिरीश आणि एंजल यांचं उत्तुंग प्रेम दिसतं, तर हा दुसरा भाग एंजल आयएएस झाल्यानंतर करियर आणि प्रेम यांच्यामध्ये तिची कशी दोलायमान अवस्था होते, ते सांगतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गिरीश आत्मसन्मान आणि प्रेमभावना यांच्या द्वंद्वात अडकतो. एंजल आपल्या स्वप्नांसाठी आपल्या प्रेमाला, गिरीशला सोडून देईल की मग त्यांचं प्रेम काळाच्या या कसोटीचा सामना करेल? हे जाणून घ्यायचं असेल, तर कलेक्टर साहिबा या कादंबरीचा हा दुसरा भाग वाचायलाच हवा. कलेक्टर साहिबा २ मध्ये एंजल आणि गिरीश यांच्या विभिन्न दृष्टिकोनांमधून उभा राहणारा नात्यांमधला पेच आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे उभा राहणारा संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. ही कादंबरी प्रेम, करियर आणि आत्मसन्मान यांच्यातील नाट्य अत्यंत सुंदरतेने विणते. त्याचबरोबर वाचकांना हा विचार करायला भाग पाडते की, प्रेम आणि करियर यांना एकाचवेळी न्याय देणं शक्य आहे का की, मग यापैकी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं असतं.
आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य | लेखक- ज्ञानेश्वर जाधवर
मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रामाणिकपणे तरुण- तरुणींच्या जगण्याचे भावविश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या अक्राळविक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकीनऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही, ते आत्महत्येसारखा पर्याय जवळचा करतात; पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते. स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्या उभ्या राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून ते परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावे, तर समाज मान्यता देत नाही; लग्न होत नाही म्हणून त्यांच्यावर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरू होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचे खच्चीकरण होते; काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमके काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.
Share
