Skip to product information
1 of 3

Set Of 3 Chhava +Shri Shambhuchhatrapati Smarak Granth +Sadhuputra Shambh [By Shivaji Sawant+Sushant Sanjay Udawant +Nitin Thorat]

Set Of 3 Chhava +Shri Shambhuchhatrapati Smarak Granth +Sadhuputra Shambh [By Shivaji Sawant+Sushant Sanjay Udawant +Nitin Thorat]

Regular price Rs. 1,110.00
Regular price Rs. 1,480.00 Sale price Rs. 1,110.00
25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

छावा
‘राजा शिवाजी’ हा निर्विवाद सिंहपुरुष होता, परंतु शिवपुत्र ‘संभाजी’ हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्याने; पण पुरेपूर उमजले आहे. ‘छावा’च्या जोरदार स्वागताने ते सिद्धही झाले आहे. एकदोन नव्हे; तर एकाचवेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेनाधुरंधर! मराठ्यांच्या इतिहासात असा सेनापती एकमेव ‘संभाजी’च होऊन गेला. जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीस लाखांची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब – या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती, स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वास घातक्यांची! रणांगणाचा वाघ सतत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलूखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येताना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि ‘बुधभूषणम्’ काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा; हे पाहिले की, प्रतिभा देवदत्त असली; तरी एक अजब आणि विस्मयकारी देणगी आहे, असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्याले की, मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते; हे या छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका तर खरीच; पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!

साधूपुत्र शंभू
🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :
साधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव

📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू
💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)

साधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...

प्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.

दुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा. 

View full details