Skip to product information
1 of 5

Shivarayanche Rantandav By Prem Dhande (शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे)

Shivarayanche Rantandav By Prem Dhande (शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे)

Regular price Rs. 295.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 295.00
26% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

शिवरायांचे रणतांडव | लेखक - प्रेम धांडे
पाने - २८०  


नोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...

अफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.
खानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.
पण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी! 
पन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!
त्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!
रक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...
'शिवरायांचे रणतांडव'

View full details