Skip to product information
1 of 1

Aalasavar Mat Kara By H A Bhave

Aalasavar Mat Kara By H A Bhave

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आळस हा मानव जातीचाच मुख्य शत्रू आहे. माणसाची प्रगती होण्यास अडथळा मुख्यतः आळसाचाच असतो. महान माणसांनी आळस दूर ठेवला म्हणूनच त्यांनी महान कार्य केले. आळसाला पळवून लावण्यासाठी पहाटे उठणे व ईश्वरस्मरण करणे याचा उपयोग होतो. चिनी विचारवंत कन्फ्युशिअस म्हणतो की, “हमालासारखे काम करावे व राजासारखे जेवावे.” काम न केल्यामुळे आळशी माणसाचे आरोग्य चांगले रहात नाही. सतत मेहनत हे आळसाविरूध्द तत्व आहे. समाजाच्या दृष्टीने आळशी माणूस संपूर्ण निरूपयोगी आहे. गुन्हेगारीचा जन्म आळशीपणातूनच होतो. सुख व चैन हा सैतानाचा गळ असतो. आळशी माणूस सैतानाचा गुलाम होऊन जातो.
इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी सहाशेपेक्षा जास्त संस्थाने निर्माण केली. ते सर्व संस्थानिक आळशांचे राजे होते. सरकारी नोकरीत आळशीपणा करणाराच कार्यक्षम ठरतो. भिकारी वर्ग हा तर आळशीपणातूनच निर्माण झालेला आहे. आळसामुळे माणूस गंजून जातो. सतत हालचाल हा माणसाचा स्वभाव आहे. आळशी माणसाला काय काम करावे ते सुचतच नाही. जे बहुसंख्य लोक लॉटरी वा रेसच्या मागे लागतात त्यांना आयते धन हवे असते. जुगार किंवा द्यूत हे महाभारतापासून चालू आहेत. श्रम न करता धन मिळवणाऱ्या माणसामध्ये आळसाचाच मोठा अंश असतो. आळशीपणावर मात करण्यासाठी कार्याचे वेड लागले पाहिजे.

View full details