Tukobanche 51 Prernadayi Jivansutre Bhag 1,2,3 ( तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग १, २, ३)
Tukobanche 51 Prernadayi Jivansutre Bhag 1,2,3 ( तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग १, २, ३)
Couldn't load pickup availability
🎁 विशेष भेट ऑफर 🎁
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे (भाग १, २ आणि ३ + तुकाराम )
✨ संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी विचारांचा अमूल्य खजिना
✨ जीवनात यश, सकारात्मकता आणि अध्यात्माचा मार्ग दाखवणारी पुस्तके
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग १। लेखक - नवनाथ जगताप | पाने - ३५२
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ | लेखक - नवनाथ जगताप | पाने ३००
तुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे "तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग 3 - नवनाथ जगताप
२१ वे शतक हे धावपळीचे आणि प्रचंड मानसिक ताणतणावाचे आहे. आजचा तरुण स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत अनेकदा आतून विचलित आणि हताश होतो. अशा वेळी मनाला अढळ शांतता मिळवून देण्यासाठी आणि यशाची अचूक दिशा दाखवण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार हे एका मार्गदर्शक 'मॅनेजमेंट गाईड' सारखे काम करतात.
लेखक नवनाथ जगताप यांनी 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे (भाग ३)' या पुस्तकात अत्यंत सखोल, साधे आणि व्यवहारिक विश्लेषण केले आहे. हे पुस्तक केवळ अध्यात्मिक उपदेश करत नाही, तर आजच्या कॉर्पोरेट जगाला आणि नवउद्योजकांना आवश्यक असणारे विचार पुरवते. यामध्ये स्वतःच्या बाह्य मर्यादांचा स्वीकार करून अंतर्गत गुणांचे ऐश्वर्य कसे वाढवावे? संकुचित विचारांचे घरकुल तोडून ब्रह्मांडाएवढी मोठी झेप कशी घ्यावी? पराधीनतेची चाकरी नाकारून स्वतःच्या हिंमतीवर स्वाभिमानी साम्राज्य कसे उभे करावे? याचे अप्रतिम व्यवस्थापन शास्र मांडले आहे. तात्कालिक संकटांना धैर्याने तोंड देऊन आपल्या आयुष्याचा आणि करिअरचा सुवर्णकळस गाठू इच्छित असलेल्या प्रत्येक महत्त्वाकांक्षी तरुणासाठी हे पुस्तक एक क्रांतिकारी आणि जीवन बदलणारे माध्यम ठरेल.
Share
