Skip to product information
1 of 1

Pandita Raybaghan By Nayantara Desai (पंडित रायबाघन )

Pandita Raybaghan By Nayantara Desai (पंडित रायबाघन )

Regular price Rs. 102.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 102.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Quantity

सतराव्या शतकात मुघल काळ सुरू झाल्यावर नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रामगड किल्ल्यावरील औरंगझेब याचे एक मराठी सरदार उदाराम देशमुख, यांची पत्नी सावित्रीबाई देशमुख, यांनी उदाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सरदारपद भूषविले.सावित्रीबाई देशमुख यांनी पतीचे सरदारपद हाती घेताच अनेक लढाया हातात तलवार आणि पाठीला भाला घेऊन गाजवल्या त्या पाहून सम्राट औरंगझेब ह्याने त्यांना 'स्त्री शार्दुल' हा उंची किताब बहाल केला पण मुळात त्या किताबाचा उल्लेख 'रायबागन' असा केला जातो त्याचा कवी परमानंद यांनी सांगितल्याप्रमाणे खरा अर्थ किंवा उल्लेख 'राजव्याघ्री' असा आहे, परंतु सरळ मराठी बोलीत आणि हिंदी भाषेत 'रायबागन' असा आजही वापरात आहे. १६५८ मध्ये स्वतःचा खंदा लढवय्या पुत्र जगजीवनराव हा दिल्ली जवळच्या सामुगड येथील एका लढाईत तिच्या डोळ्यादेखत मारला गेला, त्याच क्षणी तिने शस्त्र हाती घेतले, आणि प्रत्येक लढाई गाजवली.... सुरत येथील पहिल्याच स्वारीत मुघलांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरूध्द बाजूने तिने मुघल तलवार गाजवली होती. पण, त्याच लढाईत तिला छत्रपती शिवाजीमहाराजांनी काही काळ कैदेत ठेवले पण, मान आणि मनसब देऊन परत पाठविले. १६३२ ते १६८०-९० हा तिचा कालखंड मानला जातो. कारण, १६८० ते १६९० च्याच दशकात तिचा मृत्यू झाला.....

View full details