Osho, Swami Vivekandand Aani Kabirvani Yanchi Preranechi Triveni Sanch By Navnath Jagtap (ओशो, स्वामी विवेकानंद आणि कबीरवाणी – प्रेरणेची त्रिवेणी - नवनाथ जगताप )
Osho, Swami Vivekandand Aani Kabirvani Yanchi Preranechi Triveni Sanch By Navnath Jagtap (ओशो, स्वामी विवेकानंद आणि कबीरवाणी – प्रेरणेची त्रिवेणी - नवनाथ जगताप )
Couldn't load pickup availability
ओशोंची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
माणूस म्हणून जन्माला येणे हे एक वरदान आहे, पण 'माणूस' म्हणून जगणे ही एक कला आहे. ओशोंचे तत्वज्ञान याच कलेचा अविभाज्य भाग असणाऱ्या 'शून्यत्वाचा' उत्सव साजरा करते. हे पुस्तक म्हणजे शब्दांच्या पलीकडील त्या मौनाचा प्रतिध्वनी आहे, जो आपल्याला स्वतःच्याच अंतरंगातील गाभाऱ्यात घेऊन जातो. या ५१ जीवनसूत्रांमधून ओशो आपल्याला विचारांच्या साखळदंडांतून मुक्त करून, निखळ अस्तित्वाचा आनंद घेण्याचे आवाहन करतात. इथे नियम नाहीत, फक्त 'बोध' आहे; इथे साचेबद्धता नाही, तर प्रवाहासारखी 'तरलता' आहे. ही सूत्रे म्हणजे वाळवंटात पडलेल्या अमृताच्या थेंबासारखी आहेत, जी तुमच्या तहानलेल्या आत्म्याला तृप्त करतील. जेव्हा तर्क थकतो, तिथे ओशोंची प्रज्ञा सुरू होते.
स्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
"उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!" या अमोघ मंत्राने अवघ्या जगाला जागृत करणारे युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात, निराशा व तणावावर मात करून यशस्वी कसे व्हावे? याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या विचारांमध्ये दडलेले आहे. 'स्वामी विवेकानंद यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे स्वामीजींच्या अथांग विचारसागरातून वेचलेले ५१ अमूल्य मोती आहेत. आत्मविश्वास कसा वाढवावा ? संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा? मनाची एकाग्रता कशी मिळवावी? स्वतःमधील सुप्त ऊर्जा कशी ओळखावी? या आणि अशा अनेक प्रश्नांची सखोल उत्तरे या पुस्तकातून मिळतात. साध्या, सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेली ही जीवनसूत्रे केवळ वाचण्यासाठी नसून ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी आहेत.
कबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे
'कबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे' हे पुस्तक संत कबीरांच्या कालातीत विचारांचा आधुनिक संदर्भात घेतलेला एक मौलिक वेध आहे. मध्ययुगीन काळातील कबीरांचे दोहे आजही मानवी जीवनातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. या पुस्तकात कबीरांच्या निवडक ५१ दोह्यांचे अत्यंत सोप्या, प्रवाही आणि प्रमाण मराठी भाषेत विवेचन करण्यात आले आहे.
अहंकाराचा त्याग, सत्याचा शोध, गुरुचे महत्त्व आणि निखळ माणुसकी यांसारख्या विषयांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. केवळ अध्यात्मिक प्रवचन न राहता, दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि गोंधळातून मार्ग काढण्यासाठी हे पुस्तक एका मार्गदर्शकाची भूमिका बजावते. कबीरांचे निर्भीड विचार आणि त्यांची जीवनदृष्टी आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांती आणि जगण्याला नवी दिशा देणारी ठरेल. प्रत्येक पिढीने संग्रही ठेवावे आणि हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे.
Share
