{"title":"Aniruddh Kanisetti","description":"","products":[{"product_id":"lords-of-the-earth-and-sea-by-aniruddh-kanisetti-rama-hardikartranslator-लॉर्डस-ऑफ-द-अर्थ-ॲण्ड-सी-चोळ-साम्राज्याचा-इतिहास","title":"Lords of the Earth and Sea By Aniruddh Kanisetti, Rama Hardikar(Translator) (लॉर्डस ऑफ द अर्थ ॲण्ड सी चोळ साम्राज्याचा इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचोळांचं महान साम्राज्य अनपेक्षितरीत्या निर्माण झालेलं होतं. कावेरीच्या गाळाच्या मैदानात इ.स. सुमारे ८५०च्या आसपास अचानक त्याची उत्पत्ती झाली, तोपर्यंत शतकानुशतकं या प्रदेशात स्वयंशासित ग्रामपंचायतीच होत्या. इथूनच चोळांनी एक विशाल साम्राज्य स्थापन केलं. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशातील साम्राज्य हे भारतीय उपखंडातील सर्वांत प्रवळ सत्ता बनण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ होती; हे स्थान तोवर सहसा दख्खन किंवा उत्तर भारतातील साम्राज्यांनीच राखलेलं होतं, चोळ राजे जितके सृजनशील आणि कल्पनाशील होते तितकेच ते अनपेक्षित कृती करणारेही होते. त्यांनी इजिप्तच्या पिरॅमिडखालोखाल पृथ्वीवरील सर्वात उंच, स्वतंत्रपणे उभी असलेली भव्य मंदिर बांधली. चोळ राण्यांनी नटराजासारखे देव, आणि देवासमोर तमिळ कवितांचे गायन असे उपासनेचे नवीन प्रकार लोकप्रिय केले. त्याचबरोचर, चोळ हे आश्चर्यकारकपणे धाडसी होते. त्यांनी केवळ शक्तिशाली दख्खन आणि उत्तर भारतावरच नव्हे; तर आग्नेय आशिया आणि श्रीलंकेवरही हल्ले केले. हे राजघराणं इतके प्रभावशाली आणि आज इतकं लोकप्रिय असूनही त्याची खरी ऐतिहासिक कामगिरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत विसरली गेली हेही एक आश्चर्यच कारण त्या सगळ्या गोष्टी मिथक आणि दंतकथेत विरून गेल्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात पुरस्कार विजेते इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी चोळांच्या या जगाला जिवंत करतात. केवळ राजे आणि राण्या, सेनापती आणि ‘सेवा लवाजम्या तल्या खिया यांच्याविषयी लेखक आपल्याला सांगत नाही, तर सर्वसामान्य म्हणजे लहान लोकांच्या कथादेखील सांगतात, ज्यांची आयुष्यं मोठमोठ्या घटनांमुळे हेलकावे खायची तर कधी उध्वस्त व्हायची. तमिळ किनाऱ्यावरून आग्नेय आशिया आणि चीनकडे जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरचं जीवन कसं असायचं? मंदिरांमध्ये भक्तांना आणि युद्धाच्या वेळी सैनिकांना कोणत्या प्रकारचं जेवण दिलं जायचं? रागाच्या भरात आपल्या भावाची हत्या करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्याचं पुढे काय झालं? एक श्रीमंत घराण्यातली खी डोक्यावर लिंबू ठेवून सती का गेली? हजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम  स्त्रोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तका केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिमेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Aniruddh Kanisetti \/ Marathi","offer_id":47231166873858,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/book-cover-for-website_7375d2d7-8037-4bec-aadf-e5e1d9043d09.png?v=1768632936"},{"product_id":"aniruddh-kanisetti-2-book-set-अनिरुद्ध-कनिसेट्टी-दोन-बेस्ट-सेलर-पुस्तकांचा-संच","title":"Aniruddh Kanisetti 2 Book set (अनिरुद्ध कनिसेट्टी दोन बेस्ट सेलर पुस्तकांचा संच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलॉर्ड्स ऑफ द अर्थ ॲण्ड सी\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eहजारो शिलालेख आणि शेकडो दुय्यम  स्त्रोतांवर आधारित, सखोल संशोधन केलेलं हे पुस्तक केवळ राजे आणि राण्यांच्या चमकदार कथा आपल्याला सांगत नाही, तर ते आपल्याला हजारेक वर्षांपूर्वीच्या शेतकरी वस्त्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या प्रवेशद्वाराचंही काम करतं. या पुस्तकात कनिसेट्टी तथ्य आणि काल्पनिक गोष्टी यांना वेगळं करण्याचं महत्त्वाचं काम करतात, आणि आपल्याला मानवी इतिहासातील एक असामान्य अशी कहाणी सांगतात.\u003cbr\u003eकिमत – 500\u003cbr\u003eपाने – 428\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलॉर्ड्स ऑफ द डेक्कन\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eसहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याच दिसतं, मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाच गंभीरपणे स्वागत झालं आहे. या पुस्तकात अनिरुद्ध कनिसेट्टी यांनी अंधारावर प्रकाशझोत टाकला आहे आणि मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीच्या म्हणजे सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळातील दख्खनला, त्याच्या सगळ्या ऐश्वर्यासह आणि निखळ कीर्तीसह चोखंदळ वाचकांसमोर जिवंत केलं आहे.\u003cbr\u003eकिमत – 499\u003cbr\u003eपाने – 416\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Aniruddh Kanisetti \/ Marathi","offer_id":47279540142338,"sku":null,"price":849.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_b9b990db-7565-45bd-b31a-bb7209770cc4.jpg?v=1769065009"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/aniruddh-kanisetti.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}